Posts

Showing posts with the label लेख

२१ दिवसांच्या चॅलेंजच्या शेवटी

२० दिवसांपुर्वी मी एक लक्ष्य निश्चित केले होते की मी दररोज एक लेख लिहीन व वाचकांसोबत शेअर करेन. हे शेअर करण्याचा उद्देश हा होता कि त्यानिमीत्ताने माझा हा संकल्प दृढ होईल. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मी एकही शब्द लिहिला नव्हता आणि काही लोकांनी मेसेज पाठवले होते की ते माझ्या लेखाची वाट पहात आहेत. त्यामुळे लेख लिहिण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली. पहिला लेख लिहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी अजून काही साध्य करू शकतो, ते लोकांबरोबर शेअर करू शकतो आणि ह्या सर्वांचे एका सामाजिक प्रयोगात रुपांतर करू शकतो. आहारातील साखर कमी करणे, १०० सुर्यनमस्कार घालण्याची क्षमता विकसित करणे आणि मेडिटेशन करणे असे तीन अधिकचे संकल्प निश्चित केले. वाचकांकडून आणि आजुबाजूच्या लोकांकडून मिळालेला प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षा बराच जास्त होता. माझे बरंचसं लेखन विविध विषयांवर झालं. बरेच लेख माझ्या कामाच्या कृषि, शेतकरी ह्या विषयांवर होते पण ह्या एकमेकांशी जोडलेल्या जगात मला वाटतं ह्या विषयांशी प्रत्येकाचा संबंध दुरान्वये तरी येतोच. हे चॅलेंजच्या स्वरूपात लेखन करण्याआधी काही विषय माझ्या डोक्यात घोळत होते पण त्यावर...

प्रक्रिया कि परिणाम

नोकऱ्या बदलण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांमधून आणि तिथे असलेल्या बॉसकडून शिकायला मिळतं. मी नोकरी केलेल्या एका संस्थेमध्ये प्रक्रीयांवर भर दिला जायचा. त्यांचा असा ठाम विश्वास होता की जर प्रक्रीया आणि व्यवस्था निर्माण केल्या आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले तर परिणाम मिळतातच. मी काम करत असलेल्या दुसऱ्या एका संस्थेमध्ये कुठल्याही मार्गाने परिणाम मिळवण्यावर भर असायचा. असे परिणाम प्राप्त करण्यासाठी व्यवस्था मात्र विकसित केल्या नव्हत्या. दोन्ही संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांवर ह्या व्यवस्थांचा किंवा अपेक्षित परिणामांचा ताण येत होता. पहिल्या संस्थेमध्ये जिथे प्रक्रीयांवर भर होता तिथे परिणाम दृष्टीपथात न राहण्याचा संभव असे. नियमबध्द पध्दतीने वागताना, जर आवश्यक अपेक्षित परिणाम बदलले तर त्यांना साध्य करण्यासाठी लोकांकडे फार कमी पर्याय असत. संस्थात्मक पातळीवर खुप कमी लवचिकता होती आणि बऱ्याचवेळा मठ्ठ पध्दतीने आदेश पाळण्यापलिकडे लोक काही करू शकत नसत. दुसऱ्या संस्थेमध्ये जिथे परिणाम महत्वाचे होते तिथे बऱ्याचवेळा असे लक्ष्य निश्चित केले जात असे कि ते साध्य करताना संस्थेमधल्या प्रक्रीय...

कृषिविविधतेचा स्वीकार

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ज्या कुटंबांकडे साधारण आर्थिक सुरक्षितता आहे ते पाकसिध्दीमध्ये मग्न आहेत. व्हॉट्सअॅ्पची स्टेटस सध्या खाद्यपदार्थांच्या फोटोंनी भरलेली आहेत. मुलं पोळ्या लाटायला शिकत आहेत. त्यांच्या आया घरातल्या सगळ्यांचा मूड छान रहावा म्हणून केक बनवत आहेत. लोकांना सध्या दुकानातली संपत जाणारी बिस्किटे, नुडल, पास्ता अश्या पदार्थांच्या स्टॉकची चिंता आहे. हे सगळं करत असताना कल्पना करा की असा लेख तुमच्या वाचनात आला की जगातली शेती नष्ट झाली आहे आणि मानवजातीला फक्त ५७ दिवस पुरेल इतकेच अन्न उपलब्ध आहे. तुमची भीतीग्रस्तता वाढेल आणि कदाचित मानवी जगाच्या अंताची तयारी करू लागाल कारण तुम्ही फक्त एका धान्यावर अवलंबून आहात ते म्हणजे गहू.  आधी सांगितलेला लेख खरोखर इंटरनेटवर आहे आणि काल तो वाचताना मला काही भीतीग्रस्तता आली नाही कारण मी पोटभर फणसाचे गरे खाल्ले होते. त्या लेखामध्ये मांसउत्पादन, जैव इंधने, हवामानबदलाचे शेतीवर होणारे वाईट परिणाम ह्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे सर्व प्रश्न नाकारता येत नाहीत पण त्या खाद्यसुरक्षेच्या शेवटच्या दिवसांचे मापन करताना त्यांनी ज्या सांख्यिकी मा...

इंग्रजी कि मराठी

अमरची मातृभाषा कानडी आहे. त्याला त्याशिवाय इंग्रजी, मराठी, हिंदी आणि त्याच्या पुर्वजांची चित्पावनी भाषाही येते. ह्या भाषा तो फक्त बोलूच नव्हे तर वाचू आणि काही प्रमाणात लिहूही शकतो. भारतातले विविध राज्यांमधले लोक भाषिक मुद्द्यांवरून भांडत असताना, अमर म्हणजे अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला भाषा ह्या संवादाचे पूल कसे असतात ते दाखवू शकते. त्याच्याकडून तो विविध भाषा कश्या आणि कधी वापरतो ते जाणून घेणे बरेच शिकवून गेले. कुठल्या व्यक्ती असतात, संभाषणाचे संदर्भ कसे असतात त्यावर भाषेची निवड ठरते असे तो सांगतो. सध्या चालू असलेल्या २१ दिवसांच्या चॅलेंजचा भाग म्हणून एकच लेख दोन भाषांमध्ये लिहितोय. हा बराचसा अनुवाद आहे परंतु तो करताना वाचकांचा सांस्कृतिक संदर्भ लक्षात ठेवून तो करतोय. इंग्रजीच्या वाचकांचे सांस्कृतिक संदर्भ बरेच विस्तीर्ण असतात. पुर्वीही मी दोन्ही भाषांमध्ये परंतु वेगवेगळे लिखाण करत होतो. त्याच्या वाचकांच्या मराठी आणि इंग्रजीच्या दोन स्वतंत्र याद्या होत्या ज्यांना त्याप्रमाणे लिखाण शेअर करत होतो. ह्या दोन याद्यांमध्ये काही वाचक समान आहेत ज्यांना सध्याचे दोन्ही भाषांमधील लेख जात आहेत....

कोकणातले हापूस आंबे

ह्या वर्षी हापूस आंब्यांचे रत्नागिरीमधले उत्पादन आतापर्यंतचे सर्वात कमी आहे. आमच्याकडे आतापर्यंत असलेल्या सरासरीच्या फक्त १०% उत्पादन आहे. आंब्यावर आधारीत अर्थव्यवस्था सर्वात वाईट अवस्थेत आहे. असलेल्या थोड्याफार उत्पादनाची सध्या लॉकडाऊनमुळे विक्री करणेही कठीण होऊन बसले आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर मजूर, कृषि सेवाकेंद्र चालक आणि वाहतुक व्यावसायिक अश्या सर्वांवरच अनिश्चिततेचे सावट आहे. जे काय थोडेसे पैसे हातात मिळतील ते पुढच्या वर्षीचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे नसतील. गेले ६० पेक्षा जास्त वर्ष कोकणातला हापूस आंबा ग्राहकांच्या गळ्यातला ताईत झाल्यासारखा आहे कारण त्याचा असलेला एकमेवाद्वितीय असा स्वाद, चव आणि सुवास. भारतातल्या कुठल्याही आंब्यापेक्षा हा आंबा विशेष वेगळा आहे. त्याच्या स्थानाशी हे वेगळेपण जोडले गेले आहे. लाल जांभ्या दगडाच्या जमिनी, सम हवामान, भरपूर मान्सूनचा पाऊस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समुद्रावरची दमट खारी हवा ह्या सर्वांचा कोकणातला म्हणून जो काही आहे हापूस तो बनवण्यात खास वाटा असतो. हे फक्त एक साधे आंब्याचे फळ नाही तर खवैय्यांसाठी असलेला तो आनंददायी अनुभव आहे. पण तरीही शेतक...

आभासी माध्यमे

ऑर्कूट बुयुक्कोकटेन हा २००४ साली गूगलमध्ये काम करत होता आणि त्याला दिलेल्या स्वतःच्या प्रोजेक्टवर काम करण्याच्या २०% वेळेमध्ये त्याने एक समाजमाध्यम तयार केले ज्याचे नाव त्याच्या बॉसने ऑर्कूट असेच ठेवले. हे माध्यम वाढावे म्हणून त्यांनी जोडल्या गेलेल्या सदस्यांना त्यांच्या संपर्कांना जोडण्यासाठी खास निमंत्रणाद्वारे जोडता येत होते. साधारण २००७-८ च्या दरम्यानची माझ्यासारखे अनेक लोक नव्याने मिळत असलेल्या इंटरनेटच्या सुविधेमुळे त्यांचे संपर्क जुने तुटलेले मित्रमैत्रीणी, प्रियजन परत जोडण्याबद्दल खुप उत्साहात होते. मी ऑर्कूटमध्ये सहभागी झाल्यानंतर साधारण एकाच वर्षानी एका अमेरीकेत स्थायिक झालेल्या मैत्रीणीने तिच्या संपर्कातल्या सगळ्यांना मेसेज पाठवला की ती आता फेसबूक जॉइन करते आहे आणि तिथेच आता कनेक्ट होऊया. मी काही फेसबूकवर जाण्यात फारसा उत्साही नव्हतो. एक तर त्यावेळेला असलेले फोन अजुनही स्मार्ट नव्हते आणि इंटरनेट फक्त ऑफीस आणि सायबर कॅफेमध्ये उपलब्ध हो्ते. २०१० मध्ये आफ्रीकेत काम करत असताना बरोबरचे अनेक सहकारी ब्रिटन, अमेरीका, हॉलंड अश्या प्रगत देशामधले होते आणि ते सर्व फेसबूक भरपूर वापर...

शेतकरी भाताची शेती का करतात?

हा प्रश्न कदाचित शेतकरी मुळात शेतीच का करतात असा असू शकला असता पण तो मुद्दा इतका गुंतागुंतीचा आहे की मी फक्त साध्याश्या भातपीकाविषयी हा लेख मर्यादीत ठेवला आहे. भात हे भारतातले महत्वाचे पीक आहे आणि भारताच्या सर्व राज्यामध्ये घेतले जाते. माझे बरेचसे निरीक्षण आणि अभ्यास जेवढा आहे त्यावर आधारीत असे म्हणता येईल की भाताचे पीक अतिशय कष्टदायी आहे आणि कुटंब सदस्यांची मजूरीची किंमत लक्षात घेतली तर ते तोट्यात असते. हि परिस्थिती गेली २५ वर्षे बहुतांशी तशीच आहे. भारतातल्या शेतीवर अवलंबून असलेल्या आणि त्यातही धान्य पिकांच्या शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण कमी होत चालले असताना शेतकरी भातासारख्या पिकाची लागवड अजूनही करत असतात आणि बऱ्याचवेळ दुसरा पर्याय नाही म्हणून करत असतात. असे का? एक ग्रामीण परिस्थितीचा घेतलेला हा एक छोटासा शोध. भाताची खरेदी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यासाठी किमान आधारभुत किंमत दिली जाते. हि किमत पर्याप्त नसली तरी पंजाब, हरियाणासारख्या राज्यात मोठी जमीनधारणा असलेले शेतकरी यांत्रिक पध्दतीने भात शेती करतात. तसेच त्यांना तिथल्या शासनाकडून मोठ्या अनुदानावर वी...

लोकसंख्या कमी होताना

आपण आपल्या देशातल्या सर्व समस्या वाढलेल्या लोकसंख्येशी जोडत असतो. परंतु असाही एक मोठा वर्ग आहे ज्याची लोकसंख्या कमी होत आहे. त्यांच्याबाबतीत पुढे काय होणार आहे त्याची जाणीव आताच ठेवणे महत्वाचे आहे. अर्थात आपल्या देशातल्या शिक्षित वर्गामध्ये लोकसंख्या कमी होण्याचे परिणाम आताच जाणवायला लागले आहेत. माझ्या स्वतःच्या कुटूंबाच्या इतिहासाकडे पाहिले तरी पुरेशी संख्यात्मक माहिती मिळते. माझ्या पणजोबांच्या काळामध्ये एका जोडप्याला साधारण ८ तरी मुले होत होती. माझ्या आजोबांना ४ मुले झाली. त्या मुलांना पुढे प्रत्येकी प्रत्येकी सरासरी १.५ मुलेच झाली. माझ्या पिढीत ही संख्या ०.६६ वर आली आहे. जसजशी शैक्षणिक पातळी वाढत चालली आहे तसे कमी मुले असण्याचे आर्थिक फायदे लोकांना लक्षात आले आहेत आणि लोक कमी मुलांना जन्माला घालत आहेत. भारत सरकार आपल्या जनतेला ’हम दो हमारे दो’ चे आवाहन करत होते तेंव्हा चीन सक्तीने एक जोडपे एक मुल धोरण राबवत होता. सध्या चीनमध्ये त्या धोरणाशी संबंधित समस्या जाणवायला सुरूवात झाली आहे. आपल्या सुशिक्षित उच्च आणि मध्यमवर्गाने स्वेच्छेने एक मुल धोरण अवलंबले आहे आणि त्यांच्या समस्याही साध...

प्रसार इनोव्हेशनचा

इनोव्हेशन म्हणजे एखाद्या पध्दतीच्या किंवा साधनाच्या स्वरूपात असलेली एक नवीन सर्जक कल्पना जी एखादी गरज पूर्ण करण्यासाठीचा उपाय असते. आपल्या बाजारआधारीत अर्थव्यवस्थेमध्ये आपल्यावर सतत विविध प्रकारच्या इनोव्हेशनचा जणू वर्षावच होत असतो. त्यामुळे कधी कधी उपलब्ध इनोव्हेशन आपल्याला महत्वाचे आहे किंवा नाही हे सुध्दा आपल्याला समजणे कठीण होत असते. बऱ्याचश्या मोबाईल फोन कंपन्या दर काही महिन्यांनी नवनवीन मॉडेल बाजारात आणत असतात. एक ग्राहक म्हणून आपण कोणत्या मॉडेलचा कोणत्या कंपनीचा मोबाईल फोन घ्यावा आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे ह्याबाबतीत आपण गोंधळलेले असतो. मला ह्या मोबाईल कंपन्या आपल्या इनोव्हेशन किंवा मार्केटींगचे धोरण कसे आखतात ह्याबद्दल फारशी माहिती नाही पण मी काम करतो त्या शेती आणि सामाजिक प्रकल्पांच्या क्षेत्रात ह्या इनोव्हेशनचा प्रसार कसा होतो त्याबद्दल माझी काही निरीक्षणे मात्र आहेत. मी एका प्रकल्पावर काम करत होतो ज्यामध्ये भातलागवडीचे श्री नावाच्या तंत्राचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यात येत होता. ह्या श्री तंत्रामध्ये शेतकऱ्यांना आपली लागवडीची पध्दत बदलणे आवश्यक होते ज्यामुळे...

शेतीतील युवापिढी

काही दिवसांपुर्वी मी एक नाशिक जिल्ह्याच्या एका तालुक्यातील शेतीच्या अभ्यासामध्ये सहभागी झालो होतो. त्या अभ्यासामधला एक छोटा प्रश्न होता की तरूण शेतीमध्ये कसे सहभागी होत आहेत? त्यांना शेतीमध्ये रहायचे आहे की अन्य व्यवसायांचा पर्याय त्यांना अधिक चांगला वाटतो. आपली समाजव्यवस्था बरीचशी पुरुषप्रधान असल्यामुळे युवतींनी शेतीमध्ये काहीही केलं तरी ते असलेल्या समाजनियमांना अपवाद असल्याने साधारण समाजातील कल समजून घेण्यासाठी बऱ्याचश्या पुरुष युवकांसोबत ही चर्चा झाली. ह्या चर्चांमधुन बरेच लक्षवेधी मुद्दे निदर्शनास आले. जिथे शेतीचा खुप चांगला विकास झाला होता, तिथे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली होती आणि शेतकऱ्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता आले होते आणि ही मुले शहरांमध्ये बऱ्याच प्रमाणात चांगल्या सुरक्षित नोकऱ्या मिळवू शकली होती. ज्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नात वाढ करता आली नव्हती त्यांना आपल्या मुलांना उच्चशिक्षण देता आले नव्हते. असे जे युवक होते ते आपल्या शेतीमध्येच राहण्यास इच्छुक होते. ह्या त्यांच्या निर्णयामागील कारणे विचारली तेंव्हा बऱ्याच जणांनी सांगितले की शहरात जाऊन ज्...

परसबाग न करण्याची सहा कारणे

सर्वप्रथम परसबाग म्हणजे काय हे समजून घेउया. परसबाग म्हणजे तुमच्या घराजवळची किंवा तुमच्या शेतातील छोटी जागा जेथे स्वतःच्या गरजेपुरती प्रामुख्याने फळे व भाजीपाल्याची शेती केली जाते. काही ठिकाणी जेथे मुख्य निवास हा शेतजमीनीतच असतो तेथे व्यावसायिक पिके आणि परसबाग एकाच क्षेत्रात असतात. मला स्वतःला परसबाग ह्या विषयात काम करण्याची संधी दोन वेळा मिळाली आहे. एक म्हणजे आमच्या स्वतःच्या परसबागेत काम करताना आणि दुसरी म्हणजे काही सामाजिक प्रकल्पांमध्ये परसबाग हा विषय हाताळताना. जर तुमच्याकडे आवश्यक अशी इच्छा असेल आणि शारिरीक क्षमता असेल तर तुम्ही स्वतःची परसबाग तयार करू शकता. तीन अत्यावश्यक घटक मात्र असे आहेत की ज्यांचा जर अभाव असेल तर परसबाग तयार करण्यामध्ये बाधा येऊ शकते. पहिला घटक म्हणजे जागा. फक्त शहरातच नव्हे तर भारतातील ग्रामीण भागांमध्ये सघन वस्ती असल्यामुळे परसबागेला आवश्यक अशी जागा नसते. दुसरा घटक म्हणजे पाणी. देशाच्या बऱ्याच भागात पेयजलाचेही दुर्भिक्ष असते तेथे झाडांसाठी पाणी मिळणे कठीण होऊन बसते. वेळ हा तिसरा घटक आहे. बऱ्याच जणांना अन्य कामांमुळे किंवा सतत घरापासून दूर रहावे लागत अस...

मातीतले सेंद्रीय कर्ब

आपल्याला विविध माध्यमांद्वारे हवामान बदलाबद्दल बऱ्याच वेळा जागृत केले जात असते. हवामान बदलाचे वाईट परीणाम आपल्याला विविध प्रकारे सहन करायला लागत आहेत. काही तज्ज्ञ लोक सध्या होत असलेल्या करोना विषाणूच्या वाढत्या साथीचा संबंधही हवामान बदलाशी जोडत आहेत. सगळ्यात जाणवणारा आणि आपल्या दैनिक जीवनाशी निगडीत असलेला हवामान बदलाचा एक घटक म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण. हवेतल्या वाढत्या धुरामुळे व अन्य प्रदुषणजन्य घटकांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहेच. अजुन एका हवामान बदल घडवणाऱ्या घटकाकडे मात्र आपले फारसे लक्ष गेलेले नाही तो म्हणजे मातीतील सेंद्रीय कर्ब. एका शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अंदाजानुसार आपल्या जगातल्या मातीमध्ये २७०० गिगाटन एवढा कार्बन साठवलेला असतो जो की हवेतल्या कर्बाच्या ३ पट आहे. हवेमधल्या कार्बनचे एक चक्र सतत चालू असते. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे हवेतला कार्बन डायऑक्साईड वापरून त्यांचे अन्न बनवत असतात. जेंव्हा मातीतल्या सेंद्रीय पदार्थांचे विघटन होते तेंव्हा हा कार्बन डायऑक्साईड परत हवेत जात असतो. असा हा मातीतला कार्बन जो सेंद्रीय स्वरूपात...

खाद्यपदार्थ आठवणीतले देशांच्या अंतर्भागातले

माझ्या कामामुळे मला विविध अंतर्भागांमध्ये जावे लागत असे. मी मग खायचे जेवायचे काय करतो हा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारला जातो. बऱ्याचश्या ठिकाणी चांगली हॉटेलं नसतात आणि स्वच्छतेचाही अभाव असतो अश्या परिस्थितीत जेवणखाण सांभाळणे हे खरंच कठीण असते. चांगले चविष्ट पदार्थ खायची आवड असली तरी मी त्याबाबतीत चोखंदळ नाही त्यामुळे समोर येणारे अन्न मी चाखूनतरी पाहतच असतो. ह्या सवयीमुळे मला काही मोठ्या शहरांमध्ये माहीत नसलेले पण ह्या अंतर्भागातील लोकांनी कित्येक पिढ्यांपासून खास जपलेले परिपूर्ण चवीचे पदार्थ खायला मिळाले आहेत. ह्या लेखात मला सर्वात आवडलेल्या अश्या पाच खाद्यपदार्थांची माहिती देत आहे. १. मणिपुरी थाळी- मणिपुरमधल्या काकचिंग नावाच्या एका गावात मी एका महिलांनी चालवलेल्या खानावळीमध्ये गेलो होतो. तिथल्या थाळीमध्ये विविध पदार्थ पुर्वी कधीही न खाल्लेले असे होते. थाळीमध्ये छोट्या दाण्यांचा चिकट भात होता. त्याची चव अप्रतिम होती. वरण, दोन भाज्या आणि चिकन होतं. सर्व गोष्टी स्थानिक प्रकारच्या होत्या आणि त्यात चाईव्हची पात, रानमोहरीचा पाला अश्या फक्त मणिपुरच्या परसबागांमध्ये पिकवल्या जाणाऱ्या गोष्ट...

ऑगस्टमध्ये पालेभाजीऐवजी कोबी विकत घेताना

तीस वर्षांपुर्वीचे आणि आताचे  विलेपार्ल्याचे रस्त्यावरचे भाजी मार्केट आहे तिथेच आहे पण त्यात बदल घडलाय. पुर्वीपेक्षा मार्केटमध्य़े भाजी, फळफळावळ ह्याची आकर्षकता आणि विविधता वाढली आहे. तिथे तुम्हाला जवळ जवळ सर्व प्रकार मिळतात ज्याच्यामध्ये वसई मधल्या स्थानिक भाज्यांपासून न्युझीलंडमधुन आयात किवीफ्रुटचा समावेश आहे. तिथे कुठल्या गोष्टी जास्त प्रमाणात मिळतात ह्यामध्ये मात्र बदलत्या काळानुसार बरेच बदल घडलेले आहेत. उदा. ऑगस्ट महिन्यात पुर्वी लाल माठ, हिरवा माठ, चवळी, अळू अश्या अनेक पालेभाज्या जास्त प्रमाणात येत असत पण आता कोबी जास्त प्रमाणात दिसतो. अर्थात ग्राहकांमध्येही हळूहळू बदल घडत गेला आहे. नऊवारी साड्यांच्या ऐवजी पाचवारी आणि त्याऐवजी पंजाबी ड्रेस असे बदल होत आताच्या नवीन जमान्यातील सगळ्य़ा ग्राहक महिला जीन्समध्ये असतात. त्या आता लाल माठाऐवजी कोबी घेणं पसंत करतात. आणि त्यामुळे परिणामतः बाजारात ऑगस्टमध्ये कोबी भरपुर असतो ह्यात समजून घेण्यासारखं काही विशेष नाही असं कुणालाही वाटेल. पण ह्या आधुनिक मातांना आपल्या मुलांविषयी काळजी वाटते कारण त्यांनी शेतकरी कोबीवर जहाल किटकनाशक वापरतात ह्या...

एक आर्थिक-मानसिक प्रयोग

शेतकरी आत्महत्या हा मुद्दा सध्या सतत इतका चर्चिला जातो की लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी साधारण सरासरी १३,५०० शेतकरी आत्महत्या करतात. जर तुलनात्मक विचार करायचा झाला तर आतापर्यंतची २००४ पासूनची सर्वात मोठी आपत्ती म्हणजे उत्तराखंडचे पूर ज्याच्यामध्ये त्यापेक्षा कमी म्हणजे ४००० लोक मरण पावले होते. माझ्या विदर्भामधल्या शेतीविषयक प्रकल्पांमधील कामामुळे शेतकरी आत्महत्या हा विषय जवळून व थेट समजून घेण्याची संधी मिळाली. मानसशास्त्रातील संशोधनानुसार हे सिध्द झाले आहे की आत्महत्येच्या निर्णयाप्रति पोचण्याआधी त्या व्यक्तीमध्ये मानसिक ताणतणाव टोकाला पोचलेले असतात. माझ्या शेतकऱ्यांच्या चर्चांमध्ये हे मुद्दे येत असत. निव्वळ पावसावर आधारीत शेतीवर पूर्ण अवलंबित्व, आणि त्या पिकांमधून वर्षातुन एकदाच मिळणारे घाऊक उत्पन्न ह्याबद्दल ते प्रकर्षाने बोलत असत. अन्य आर्थिक उत्पन्नाचे स्रोत त्यांच्याकडे नसत आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असत. जे उत्पन्न होते ते असुरक्षित आणि अशाश्वत होते. त्यामुळे त्यांच्या जीवनात प्रचंड ताण निर्माण होत होता. काही वर्षांनी मी...

बुंदेलखंडमधल्या भात खाचरांची न सांगितलेली गोष्ट

मी एका सामाजिक प्रकल्पांना मदत करणाऱ्या मोठ्या संस्थेत काम करत असे. माझ्याकडे बुंदेलखंड प्रदेशामधले काही शेती आधारीत गरीबी निर्मुलन प्रकल्प होते. बुंदेलखंड हा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमांवर पसरलेल्या १० जिल्ह्यांचा खुप मोठा प्रदेश आहे. तिथे एकही मोठे शहर नाही, भाग बराच दुष्काळी आहे, तिथे भुकबळीही होत असतात कधीकधी आणि कमालीची गरीबीही आहे. त्यात तिकडची सामाजिक विषमता आणि भ्रष्ट व्यवस्था मिळवली की परिस्थिती किती निराशादायी आहे ह्याचा अंदाज येतो. आमच्या प्रकल्पामधला एक कार्यक्रम होता शेतीचे बांध घालण्याचा. त्याद्वारे शेतामध्ये असणारे पाणी बाहेर जाण्यापासून रोखले जात होते व पाण्याची पिकाला उपलब्धता वाढत होती. पाण्याच्या जमीनीत मुरण्यामुळे भुजल पातळी सुधारणार होती. पण हे काम करताना एक वेगळीच समस्या उद्भवली. अतिपाऊस झाल्यावर शेतात बांधांमुळे पाणी साठत होते आणि शेतात त्यावेळी असणाऱ्या उडीद पिकाला ते नुकसानकारक होते. शेतकरी घातलेले बांध तोडत होते. आमचे प्रकल्प करत असलेल्या कामाला एक मुलभुत उद्देश होता, त्यासाठी लागलेले परिश्रम, तांत्रिक रचना आणि आर्थिक गुंतवणूक हे स...

३ संकल्प – भाग ३: भयकारक साखर

मला माझ्या पणजोबांच्या, आजीच्या वडलांच्या, दोन गोष्टी आठवतात. ते जेंव्हा आमच्याकडे मुंबईला यायचे तेंव्हा त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे आम्ही पंतवंडे त्यांच्या फार जवळ राहायचो नाही. पण तरीही ते यायचे तेंव्हा त्यांच्याभोवती जमा होत असू कारण त्यांनी सोबत प्रत्येकासाठी श्रीखंडाच्या गोळ्यांची पाकिटे आणलेली असायची. ती नंतर अर्थात आजीच्या ताब्यात जायची आणि मग प्रत्येकाला दिवसाला दोन गोळ्या हातावर मिळायच्या. तेवढ्या गोळ्यांवर आम्ही बऱ्यापैकी खुश असायचो. सणाच्या दिवशी, रविवारी घरात बनणाऱ्या गोड पदार्थांची तेंव्हा आतुरतेने वाट पहात असू. लाडू, शंकरपाळे इ पदार्थ दिवाळीला वर्षातून एकदाच बनत होते. साखरेचं प्रमाण आहारात एकंदरीत खुपच कमी होतं कितीही गोड आवडत असलं, आणि ते खाण्याची सतत इच्छा होत असली तरी. मी शिक्षण संपवून मग वेगवेगळी गावं फिरून परत मुंबईत आलो. तिथल्या ऑफीसमध्ये काम करायला लागल्यावर माझ्या गोड खाण्याच्या आवडीला सर्वतोपरी पोषक वातावरण मिळालं. पुर्वी अप्रुप असलेले गोळ्या, लाडू, शंकरपाळे इ पदार्थ हे सहजपणे घराजवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध होत होते त्यामुळे महिन्यातुन कधी कधी आणले जात...

३ संकल्प – भाग २: मेडिटेशन

मेडिटेशनला बरेच जण ध्यानधारणा असा मराठी प्रतिशब्द वापरतात. पण ध्यानधारणा ही योगशास्त्रातील संकल्पना आहे आणि मेडिटेशन ह्या इंग्रजी शब्दाचा बराचसा अर्थ हा लक्षपुर्वक चित्त एकाग्र करणे असा होतो जो कि त्यापेक्षा वेगळा आहे. मला त्यासाठी नेमका प्रतिशब्द मिळत नसल्यामुळे मी इंग्रजी शब्द जसाच्या तसा वापरणार आहे. गेली १४ वर्षे मला अर्धशिशीचा त्रास होतोय आणि कधीकधी तीव्र प्रमाणात असतो. मला आठवतंय की मी २०१० मध्ये घानाला जाण्यासाठी विमानात पाऊल ठेवलं तेंव्हा मनाला बजावलं होतं की मला हा त्रास पुढचे एक वर्ष कधीच होणार नाही. मला आल्यानंतर ८ महिन्यात हा त्रास अजिबात झाला नव्हता आणि मी त्याच्या आनंदात होतो. जेंव्हा फेब्रुवारी महिना सुरू झाला तेंव्हा तापमानात एकदम १०० से. वाढ झाली. एक दिवस मी एका कार्यशाळेत असताना गटचर्चा चालू असताना मला अचानक अर्धशिशीचा त्रास सुरू झाला. असलेलं काम मी माझ्या मित्राकडे जोशुआकडे सोपवलं आणि माझ्या सुदैवाने तिकडे असलेल्या एका गेस्टरुममध्ये पडून राहिलो.  त्याक्षणाला मी फक्त डोक्याच्या अर्ध्या भागात सुरू असलेले वेदनांचे आवेग, पोटातली मळमळ आणि त्यामुळे आलेली हतबलता एवढ्य...

३ संकल्प – भाग १

माझ्या कामाच्या निमीत्ताने मला बराच प्रवास करावा लागत असतो. कधी बाहेर पडायचं, कधी परत यायचं ह्याचे निर्णय मला एकट्याला घेता येत नाहीत. मी बऱ्याच चांगल्या सवयींना सुरुवात करतो आणि प्रवासाला बाहेर पडलं की त्या सवयींची नियमीतता तुटते. प्रवासामुळे माझं वेळेचं चक्र कायम बिघडलेलं असतं. कुठे काही गोष्टी पुर्ववत करायला जावं तर पुढच्या प्रवासाचं नियोजन चालू झालेलं असतं आणि नाहीतरी आता त्या चांगल्या सवयींमध्ये खंड पडणारच असणार असतो तर कशाला त्या बद्दल चिंता करा असे विचार मनात येतात आणि ती चांगल्या सवयींची साखळी तुटलेली असते. येते २१ दिवस मी कुठेही प्रवास करणार नाही हे नक्की. त्यामुळे मी त्यांच्याकडे चांगल्या सवयी अंगी बाणवण्याची सुसंधी म्हणून बघतो आहे. ह्या चांगल्या सवयी आरोग्याशी निगडीत आहेत. पहिली सवय म्हणजे नियमीत व्यायाम, दुसरी मेडीटेशन (त्याला चपखल मराठी शब्द कोणाला माहीत असेल तर सुचवा.) आणि तिसरी सवय आहारातून अति प्रमाणात असलेली साखर हटवणे. ह्या सर्व सवयींवर काम करायला मी करोनाचे संकट येण्याआधीच सुरूवात केली आहे पण आता मी त्याला आता संकल्पाचे स्वरूप देऊ शकतो आणि योग्य न्याय देऊ शकेन असं ...

नित्यनेम २१ दिवसांसाठी

परवा आपल्या पंतप्रधानांनी पुढचे २१ दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. काही निवडक लोक वगळता बहुसंख्य जनता आपल्या घरात बसणार आहे. तुम्ही जर त्या निवडक लोकांमधले नसाल तर मी जे काही लिहीणार आहे ते आजच्या दिवशी तुमच्या परिस्थितीशी संबंधित आहे. व्हॉट्सअॅिपवरून आलेल्या विनोदांवर आज कदाचित तुम्ही हसला असाल. आज जे काही किराणा दुकानातून तुम्ही आणू शकला आहात ते आपल्या शेजाऱ्याला कसं कळणार नाही ह्याचा प्रयत्न तुम्ही कदाचित केला असेल. कदाचित टाईमपाससाठी नेटफ्लिक्स, युट्युब कडे तुमची बोटं सहज वळायला सुरूवात झाली असेल. वाईटात वाईट म्हणजे कदाचित तुमच्या कुटूंबियांचा सहवास अतिप्रमाणात होऊन आता भांडणांना सुरूवात झाली असेल. आपण भारतीय लॉकडाऊनच्या बाबतीत अन्य जगाच्या काही काळ मागे आहोत. लॉकडाऊन नंतर ज्या प्रकारच्या बातम्या इतर देशातून येत आहेत त्या वाचल्या तर मी ज्या काही शक्यता वरती लिहिल्यात त्या हिमनगाचे टोक आहे असे वाटू लागेल. बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊनमधले लोक तीव्र निराशेने ग्रासले जात आहेत, सततच्या भीतीपुर्ण वातावरणामुळे असहाय्य मनःस्थितीत जात आहेत, घरगुती हिंसाचारामध्ये वाढ होत...