ग्रामीण भागातील कचरा समस्या- ३
साधारण कुठल्याही दररोजच्या घरगुती कचऱ्यामध्ये एकुण वजनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भार हा सेंद्रीय कचरा असतो. हा कचरा जर इतस्ततः टाकला किंवा उघड्यावर जमा केला तर त्यामुळे बऱ्याच समस्या तयार होतात. अश्या कचऱ्यामुळे माश्या, डास, उंदीर, भटकी जनावरे ह्यांचा उपद्रव तर वाढतोच परंतु दुर्गंधीचीही समस्या तयार होते. ह्या कचऱ्याकडे टाकाऊ म्हणून न पाहता त्याच्याकडे एक चांगला स्रोत म्हणून बघता येते परंतु बहुसंख्य लोकांना त्याबद्दल जाणीव किंवा योग्य माहिती नसल्यामुळे हा आपल्या रोजच्या जीवनातला एक चांगला घटक फक्त वायाच जात नसतो तर आपल्या जीवनात विविध समस्या निर्माण करत असतो. ह्या कचऱ्याचे काही उपयोग आपण आता समजून घेऊ. त्याचा सगळ्यात सोपा व सहज करता येण्यासारखा उपयोग म्हणजे त्याचे खत बनवणे. घरगुती कचऱ्यापासून केलेले खत हे विविध शेतीपोषक घटकांनी समृध्द असते. त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत त्याच्या वापराने प्रचंड वाढ घडवून आणता येते. जर एखाद्या कुटंबाची स्वतःची शेती नसेल तर असे खत बनवून ते अन्य शेतकऱ्यांना देऊन त्याच्या बदल्यात विषमुक्त अन्नधान्य, फळे, भाजीपाला मिळवू शकतात. खत बनवताना ते विविध...