Posts

कोकणी खाद्यकथा- ३

एका भल्या सकाळी संपर्कात असलेल्या एका जरा सुशिक्षित  आणि सामाजिक कार्यात रस असणाऱ्या माणसाचा फोन आला. “तुम्ही इतके दिवस येताय पण आमचे लोक काही साथ देत नाहीत. पण गावात काहीतरी चांगलं व्हायलाच पाहिजे. आज संध्याकाळी याच. गट स्थापनच करून टाकू. जेवायला आमच्याकडेच या.” “जास्त त्रास करून घेऊ नका.” इति मी. “अहो त्रास कसला आलाय त्यात. आम्ही कोकणातली माणसं तुम्हाला देऊन देऊन काय देणार कुळथाचं पिठलं आणि भात.” “येस. व्हेरी मच लूकिंग फॉरवर्ड टू युवर कुळथाचं पिठलं!” सध्या पुस्तकं वाचून मी मनातल्या मनात इंग्रजी बोलण्याचा आटोकाट सराव करत होतो. आणि तसंही मावशींच्या खानावळीतलं तथाकथित घरगुती फुळकवणी खाऊन आता कायमस्वरूपी कंटाळा आला होता. त्यांच्या घरीच संध्याकाळी मीटींग सुरू झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा, गावातले लोक जमा होईपर्यंत बराच वेळ गेला होता. रात्रीचे आठ वाजले होते. मीटींग शेवटी सुरू झाली. लोकांना उत्साह चढला होता. बाकीचे लोक कसे साथ देत नाहीत. राजकारण विकासाच्या कसं आड येतं वगैरे गोष्टींना ऊत आला होता. मी त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेरच बसलो होतो आणि मला कूकरची शिट्टी ऐकू आली. एकाबाजू...

कोकणी खाद्यकथा- २

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेतोरे नावाचे एक गाव आहे. तिथल्या एका मंगल कार्यालयात जेवणाची पंगत बसली होती. मालकांच्या नातेवाईकांचा एक मुलगा सुट्टीत त्यांच्याकडे आला होता. जेवणात त्या भागात प्रचंड लोकप्रिय असलेली वाटाण्याची रस्सेदार उसळ होती. पंगतीमधले सर्वजण भात आणि उसळ परत परत मागून घेत होते. हा मुलगा उत्साहाने आपल्या काकांच्या मदतीला गेला आणि उसळ वाढायला लागला. “ए! माका वाईच रस्सो दी.” एकाने त्याला जोरात हाक मारून बोलावले. चविष्ट रस्सा आणि वाफाळता भात मस्त लागतोय ह्याचा त्याला साक्षात्कार झाला होता. त्याचं बघून शेजाऱ्याने तसेच केले. समोरचे रस्सा ओरपत आहेत हे बघून विरुध्द रांगेतले लोकही त्याला बोलवू लागले. प्रत्येकाने फक्त रस्साच घेतल्यामुळे शेवटी पातेल्यात वाटाणेच शिल्लक राहिले. तो छोटा मुलगा चिडला आणि जोरात ओरडला, “हो चोथो कोन खातलो?” सगळेजण अवाक झाले. त्याचे काका लगबगीने पंगतीजवळ गेले. “राग मानू नाका हां. ल्हान आसा.” असं सांगून त्यांनी सावरून घेतलं. लोकांना त्याची मजा वाटली. पण त्याचं वाक्य मात्र लक्षात राहिलं. आता जेवताना रस्साच खाल्ला आणि त्यातली डाळ, भाज्या तश्याच राहिल्या किंवा कुठ...

कोकणी खाद्यकथा- १

आमच्या आजीला विस्मरण होत चाललंय. चालणं फिरणं संपलंय. पलंगावर कायम बसून ती त्याच त्याच गोष्टी सांगत राहते कधीही गेलं तरी. त्यामुळे पहिलं वाक्य ऐकलं कि ती पुढे काय सांगणार ते आता माहीत असतं. मे महिन्यात पडवीत फणसाचे गरे तळण्याचा उद्योग चालू असतो. सगळीकडे चुलीच्या धुरामध्ये मिसळलेला गरम खोबरेलाचा, कच्च्या फणसाच्या गऱ्यांचा असा एक संमिश्र वास पसरलेला असतो. आजी सांगायला लागते. “आमच्यावेळी तळलेल्या गऱ्यांचं एवढं फारसं काही (महत्व) नव्हतं. आम्ही कच्च्या फणसाचे गरे वाळवत असू. बरे एकदम असे खडखडीत वाळले की मग जात्यावर दळायचे आणि त्याचं पीठ करून ठेवायचं. श्रावणाचे सगळे उपास मुळी आमचे गऱ्याच्याच पीठावर. मग त्यात हे पीठ जरा तुप घालून भाजून घ्यायचं. गुळ पातळ करून घ्यायचा त्यात हे पीठ घालायचं आणि लाडू वळायचे. फारसं काही नाही. आम्ही त्यात अजुन काही घालत नसू. आधी मुळी काही फारसं नसायचंच त्यात आजच्यासारखे काजू बीजू घालायला. नुसते लाडू नाही हां आम्ही त्याची थालिपीठं पण भाजू. आणि कश्यावर माहितीये?” आजी रंगात आलेली असते. माझ्याकडे हात दाखवत म्हणते, “तुमच्या गोड्या तेलावर नव्हे. रातांबतेलावर. आमच्याकडे मा...

End of 21 Day Challenge

20 days back, I set a goal to write an article a day and share it with readers. It was with the thought that sharing would also confirm the commitment from my side. It helped. Next day till noon while I had not been able to write a single word, some people pinged saying that they were waiting for the article. It was enough to trigger the process. After completing the write up it occurred to me that I could do more. I could have more goals which I could share and turn it into a larger social experiment. The additional goals were removing excessive sugar intake, doing 100 suryanamaskars at one time and meditation. The response from the readers and people around was beyond all my expectations. The writing was done on mixed subjects. Some of the subjects were based on my own field of work i.e. agriculture and farming, but in this interlinked world, I think these subjects are of concern to everybody. Before doing this as a challenge, most of the subjects were in my head and I had not deal...

२१ दिवसांच्या चॅलेंजच्या शेवटी

२० दिवसांपुर्वी मी एक लक्ष्य निश्चित केले होते की मी दररोज एक लेख लिहीन व वाचकांसोबत शेअर करेन. हे शेअर करण्याचा उद्देश हा होता कि त्यानिमीत्ताने माझा हा संकल्प दृढ होईल. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मी एकही शब्द लिहिला नव्हता आणि काही लोकांनी मेसेज पाठवले होते की ते माझ्या लेखाची वाट पहात आहेत. त्यामुळे लेख लिहिण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली. पहिला लेख लिहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी अजून काही साध्य करू शकतो, ते लोकांबरोबर शेअर करू शकतो आणि ह्या सर्वांचे एका सामाजिक प्रयोगात रुपांतर करू शकतो. आहारातील साखर कमी करणे, १०० सुर्यनमस्कार घालण्याची क्षमता विकसित करणे आणि मेडिटेशन करणे असे तीन अधिकचे संकल्प निश्चित केले. वाचकांकडून आणि आजुबाजूच्या लोकांकडून मिळालेला प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षा बराच जास्त होता. माझे बरंचसं लेखन विविध विषयांवर झालं. बरेच लेख माझ्या कामाच्या कृषि, शेतकरी ह्या विषयांवर होते पण ह्या एकमेकांशी जोडलेल्या जगात मला वाटतं ह्या विषयांशी प्रत्येकाचा संबंध दुरान्वये तरी येतोच. हे चॅलेंजच्या स्वरूपात लेखन करण्याआधी काही विषय माझ्या डोक्यात घोळत होते पण त्यावर...

Processes and Results

One advantage of hopping from one job to the other is that it allows you to learn from different organisations and the bosses they have for you. I have worked with one organisation which was more focused on processes. They had a firm belief that you just set up processes and systems and follow them thoroughly, results take care of themselves. The other organisation I worked at believed in achieving results in whatever way possible. There were very few established processes when it came to working towards those results. The employees of both the organisations used to take stress either from processes or from expected results. In the first organisations where focus was on processes there was always a chance to lose the vision of results. Engulfed in working as per the rules, people could do very little when result expectations changed. The organisation offered little flexibility and sometimes one had to work dumbly by following the orders. The other organisation which focused on result...

प्रक्रिया कि परिणाम

नोकऱ्या बदलण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांमधून आणि तिथे असलेल्या बॉसकडून शिकायला मिळतं. मी नोकरी केलेल्या एका संस्थेमध्ये प्रक्रीयांवर भर दिला जायचा. त्यांचा असा ठाम विश्वास होता की जर प्रक्रीया आणि व्यवस्था निर्माण केल्या आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले तर परिणाम मिळतातच. मी काम करत असलेल्या दुसऱ्या एका संस्थेमध्ये कुठल्याही मार्गाने परिणाम मिळवण्यावर भर असायचा. असे परिणाम प्राप्त करण्यासाठी व्यवस्था मात्र विकसित केल्या नव्हत्या. दोन्ही संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांवर ह्या व्यवस्थांचा किंवा अपेक्षित परिणामांचा ताण येत होता. पहिल्या संस्थेमध्ये जिथे प्रक्रीयांवर भर होता तिथे परिणाम दृष्टीपथात न राहण्याचा संभव असे. नियमबध्द पध्दतीने वागताना, जर आवश्यक अपेक्षित परिणाम बदलले तर त्यांना साध्य करण्यासाठी लोकांकडे फार कमी पर्याय असत. संस्थात्मक पातळीवर खुप कमी लवचिकता होती आणि बऱ्याचवेळा मठ्ठ पध्दतीने आदेश पाळण्यापलिकडे लोक काही करू शकत नसत. दुसऱ्या संस्थेमध्ये जिथे परिणाम महत्वाचे होते तिथे बऱ्याचवेळा असे लक्ष्य निश्चित केले जात असे कि ते साध्य करताना संस्थेमधल्या प्रक्रीय...