Posts

Showing posts from 2023

रत्नागिरी जिल्ह्यातील आत्महत्या

  21-12-2023 साधारण दोन वर्षांपुर्वी सलग दोन तीन महिन्यात आजुबाजुच्या परिसरातुन आत्महत्यांच्या घटना एकामागोमाग ऐकिवात आल्या आणि एक विषय मनात चाळवला गेला. मी पुर्वी टाटा ट्रस्ट मध्ये नोकरी करत असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्या ह्या विषयाशी संबंध आला होता आणि आपला परिसरही एखाद्या मानसिक महामारीच्या कडेलोटावर तर नाही ना अशी शंका मनाला चाटून गेली होती. साधारण विदर्भातील बऱ्याचश्या केसेस मध्यमवयीन पुरूष शेतकऱ्यांच्या होत्या. ज्यामध्ये शेतीचे कोसळलेले आर्थिक गणित आणि कुटूंबातील वाढते खर्च ह्यांचा ताळमेळ बसत नसल्याने होत असलेल्या ओढाताणीचे पर्यवसान आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात होत होते. परंतु रत्नागिरीच्या परिसरातील ज्या केस ऐकल्या होत्या त्या सर्व तरूणांच्या होत्या. नेमके काय होत आहे ह्याची अधिक जाण व्हावी ह्यासाठी आमच्याकडील एका स्थानिक वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या गेले पन्नास दिवस पाहत गेलो आणि काही निश्चित कल म्हणता येतील असे लक्षात आले. गेल्या पन्नास दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत घडलेल्या १३ आत्महत्यांची नोंद मिळाली. त्यामध्ये १८-३० ह्या वयोगटामध्ये ५ होत्या तर ३१-६०...

ग. म.

Image
  कोकणातील ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृती भारताच्या इतर ग्रामीण भागातील लोकांप्रमाणेच साधी सोपी सरळ आहे. बहुतांश कोकणातल्या बाहेरच्या लोकांचा समज असतो तसा इथला ब्राह्मण समाज पांढरपेशा नाही तर शेती बागायतीची श्रमाची कामे करणारा आहे. प्रत्येक जातीची जशी स्वतःची खाद्य परंपरा ( cuisine ) विकसित झालेली आहे तशी इकडच्या ब्राह्मण समाजाचीही आहे. तिखट, मसाले, कांदा, लसूण, तेल ह्या घटकांचा कमीत कमी वापर ही त्याची पहिली ओळख आहे. तांदुळ, खोबरे ह्या दोन स्थानिक घटकांचा वापर जेवणात अपरिहार्यपणे असणे ही अर्थात त्याची दुसरी ओळख आहे. अर्थात मग त्यात पोटओळखी ही असतात विविध तालुके, जिल्हे, पोटजातींच्या अनुसार पण इथे सांगितलेले दोन मुद्दे किमान समान प्रकारचे असतात. ब्राह्मणी भोजन ह्या नावाखाली बऱ्याचवेळा पेशवाईतला थाट, लग्नातल्या पंगती वगैरे गोष्टींची चर्चा घडत असते पण गावात उपजीविकेसाठी चार पाच आघाड्यांवर धावणाऱ्या, संयुक्त मोठ्या कुटूंबांमध्ये राहणाऱ्या समाजाला ही दहा बारा किचकट पदार्थांची गुंतागुंत रांधणे आणि खाणे परवडत नाही. हि पदार्थांची गुंतागुंत सण, उत्सव, लग्न, मुंज अश्या क्वचित प्रसंगीच असते....

अट्टहास टोमॅटोचा

साधारण असाच जुन किंवा जुलै महिना होता २०१२ सालचा. मराठवाड्याचा अजुन एक भीषण दुष्काळ पाहून झाला होता. अश्या कठीण परिस्थितीत पाण्याशी संबंधित नाविन्यपुर्ण पध्दतीने काम करणाऱ्या श्री. मधुकर धस ह्यांच्यासोबत मी त्यांनी काम केलेल्या जालना जिल्ह्यातील काही गावात फिरत होतो. एक पाणीदार माणूस म्हणून मधुकर भाउंची ओळख होती च पण त्यांची एक नवीनच बाजू मला फिरताना समजून आली. नुकत्याच दुष्काळाने तापून निघालेल्या माळरानावर नव्याने पडलेल्या पावसाने फक्त गवतच नव्हे आणि अनेकविध वनस्पती उगवून आल्या होत्या आणि मधुकरभाऊ मला अनेक वनस्पतींची माहिती आणि उपयोग सांगत होते. त्यातल्या जवळजवळ १०-१२ वनस्पती अश्या होत्या कि ज्यांचा भाजी म्हणून आहारात सहज उपयोग करता येण्यासारखा होता. मेंढपाळ कुटूबात जन्मलेल्या आणि रानामध्ये मेंढ्या चारण्यात बालपण गेले ल्या मधुकरभाऊंसारखं अनुभवसिध्द ज्ञान ज्यांच्याकडे आहे आणि जे त्याचा जीवनात उपयोग करू शकतात त्यांना टोमॅटोची किंमत १०० रुपये किलोपेक्षा जास्त झाली तरी काही फरक पडणार नाही. ज्यांना फरक पडतो ते सर्व लोक आज चिंतेमध्ये आहेत. ह्या किंमती खाली उतराव्या जेणेकरून लोक रस्त्यावर...