अनुभव विपश्यनेचा
मी विपश्यना ध्यान शिबीराला जाण्याचा निर्णय तसा सहजच घेतला नव्हता. सात आठ वर्षापुर्वी माझ्या एका मित्राने त्याबद्दल सांगितले होते तेंव्हापासून तेथे एकदा तरी जाऊन बघावे असा विचार मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी दडून राहिला होता. माझ्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट ही होती की विपश्यना ध्यान भारतात आणणारे गुरूजी श्री. सत्यनारायण गोएंका यांनी त्यांचे अर्धशिशीचे दुखणे विपश्यनेद्वारे बरे केले होते. आणि मी फक्त अर्धशिशीच नव्हे तर इतर अनेक छोट्या आजार दुखण्यांनी सतत त्रस्त असतो तेंव्हा विपश्यना शिबीर करून काही फायदा झाला तर पहावा असा विचार करत होतो. त्याबद्दल इंटरनेटवर माहितीही मिळवली पण सलग १० दिवस बाह्यजगाशी कुठल्याही संपर्काशिवाय रहायचे म्हटल्यावर त्याचा विचार रहीत केला. एका सकाळी परत एकदा विपश्यनेचा विचार मनात बळावला आणि ठरवले काही झालं तरी हे शिबीर एकदा तरी करायचंच आणि आताच काही दिवसात करायचं. बरेच शोधल्यावर ठाणे जिल्ह्यतील टिटवाळा येथील धम्म वाहिनी केंद्रामध्ये वेटींगवर जागा उपलब्ध दिसल्या. बऱ्याचश्या निराश अवस्थेत मी तिथे अर्ज केला आणि दुसऱ्याच दिवशी प्रवेश निश्चित झाल्याचा इमेल इनबॉक्समध...