Posts

Showing posts from 2016

उत्सव की स्ट्रीट पार्टी

मला काही वर्षांपुर्वी टिव्हीवर पाहिलेला एक प्रवासविषयक कार्यक्रम कायमचा लक्षात राहीला आहे. तो कार्यक्रम एका परदेशी वाहिनीने भारतासंबंधी त्यांच्या देशात दाखवण्यासाठी तयार केला असल्यामुळे त्यातील काम करणारा सूत्रधार त्यांच्या पध्दतीने त्याची भारताबद्दलची निरीक्षणे मांडत होता. कार्यक्रमाचा शेवट त्याने मुंबईच्या गणेशोत्सवाने केला. त्यातली गर्दी, प्रचंड मोठ्या मूर्ती यांच्या विहंगम दृश्यांबरोबरच तिथल्या वातावरणातील कोलाहल त्यांच्या कॅमेरामननी अतिशय व्यवस्थित टिपला होता. " वाव! मी पाहिलेली ही सर्वात भव्य स्ट्रीट पार्टी आहे." तो सूत्रधार उद्गारला. त्याच्या चेहऱ्यावरचे भारून गेल्याचे भाव स्पष्ट दिसत होते आणि त्या उद्गारांपाठीमागचा त्याचा एक प्रामाणिकपणाही. आपला मराठी भाषिक हिंदूंचा अभिमानबिंदू असलेल्या गणेशोत्सवाला तो स्ट्रीट पार्टी कसं काय म्हणू शकतो? मी मनातून त्याच्यावर फार चिडलो होतो. पण मला जाणवलं तो माझ्यासारखा मराठी नाही आणि हिंदूही नाही. त्याला तसं ह्या उत्सवाशी, देवतेशी फार देणंघेणं नाही. त्याला जे दिसत होते त्यावरून त्याने तो निष्कर्ष काढला त्यात त्याचे काहीच चुकले...

कोकणातील जमीनींचे वाद आणि आर्थिक सामाजिक विकास

नुकतीच एका जमिनीच्या वादामुळे घडलेल्या एका छोट्या गुन्ह्यामुळे मला माझ्या वडिलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आली. आमची तक्रार व्यवस्थित समजुन घेतल्यावर पोलिस निरीक्षक सहज म्हणाले, "हे सर्व आम्हाला आता रोजचंच झालंय. आमच्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये आठवड्याला किमान दहा या कुठल्या तरी प्रकारे जमिनीशी संबंधित असतात. बाकी गुन्ह्यांचे प्रमाण इकडे कोकणात तसं फार कमी आहे." ह्या विषयाचं गांभीर्य मात्र यातून सहजच समजतं. साधारण १५ गावांचं कार्यक्षेत्र आणि अंदाजे ६००० राहती कुटंबे जरी पकडली तरी साधे गणित मांडल्यास वर्षाला १०% लोकांना एका वर्षात जमिन वादामुळे पोलिस स्टेशनची पायरी चढायला लागण्यापर्यंत वेळ येते असा अंदाज मांडता येतो. असे असेल तर एकंदरीतच ह्या ग्रामीण परिसरातील सामाजिक तणाव हा प्रचंड मोठाच म्हटला पाहिजे. कोकण म्हटलं म्हणजे बऱ्याचश्या बाहेर राहणाऱ्या शहरातील लोकांच्या डोळ्यांसमोर निसर्गसौंदर्य, चित्रपटात दाखवलेली साधीभोळी माणसे वगैरे वगैरे येत असतं. परंतु असे तीव्र स्वरूपाचे सामाजिक तणाव असू शकतील याची मात्र फारशी कल्पना नसते. मला स्वतःला गावाला स्थायिक होण्यापु...

शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा आणि काही विचार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा तसा नवीन नाही. नव्वदच्या दशकात हा मुद्दा प्रकाशात आला आणि त्यानंतर माध्यमांच्या व राजकारण्यांच्या अजेंड्यावर राहिला आहे. तरीही तो सुटलेला आहे असे दिसत नाही. असे का? ह्या प्रश्नावर मला काम करण्याची संधी माझ्या सामाजिक क्षेत्रातील कामामुळे मला मिळाली. त्यामुळे मला ह्या विषयाबद्दल विचारही करता आला. हे विचार लिखीत स्वरूपात मांडणे व इतरांबरोबर शेअर करणे महत्वाचे वाटले म्हणून हा ब्लॉग प्रपंच. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की सर्वसाधारण शेतकरी हा काही सर्व मानवी भाव भावना व विचारांचे कल्लोळ ह्यांना नियंत्रणामध्ये ठेवू शकणारा स्थितप्रज्ञ योगी नाही. तो ही मर्त्य मानव आहे. आत्महत्या करणारी माणसे अती ताणतणावांखाली जगत असतात आणि ते सहन करण्याची क्षमता जेंव्हा संपते तेंव्हा हे जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे ही मानसिक प्रक्रीया शेतकऱ्यामध्ये आणि शहरी माणसामध्ये काही वेगळी नसते. मग ग्रामीण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शहरी लोकांच्या आत्महत्या ह्यामध्ये फरक जो आहे तो फक्त सांस्कृतिक आणि भौगोलिक ठरतो जो त्यांच्या जीव...