अट्टहास टोमॅटोचा
साधारण असाच जुन किंवा जुलै महिना होता २०१२ सालचा. मराठवाड्याचा अजुन एक भीषण दुष्काळ पाहून झाला होता. अश्या कठीण परिस्थितीत पाण्याशी संबंधित नाविन्यपुर्ण पध्दतीने काम करणाऱ्या श्री. मधुकर धस ह्यांच्यासोबत मी त्यांनी काम केलेल्या जालना जिल्ह्यातील काही गावात फिरत होतो. एक पाणीदार माणूस म्हणून मधुकर भाउंची ओळख होती च पण त्यांची एक नवीनच बाजू मला फिरताना समजून आली. नुकत्याच दुष्काळाने तापून निघालेल्या माळरानावर नव्याने पडलेल्या पावसाने फक्त गवतच नव्हे आणि अनेकविध वनस्पती उगवून आल्या होत्या आणि मधुकरभाऊ मला अनेक वनस्पतींची माहिती आणि उपयोग सांगत होते. त्यातल्या जवळजवळ १०-१२ वनस्पती अश्या होत्या कि ज्यांचा भाजी म्हणून आहारात सहज उपयोग करता येण्यासारखा होता. मेंढपाळ कुटूबात जन्मलेल्या आणि रानामध्ये मेंढ्या चारण्यात बालपण गेले ल्या मधुकरभाऊंसारखं अनुभवसिध्द ज्ञान ज्यांच्याकडे आहे आणि जे त्याचा जीवनात उपयोग करू शकतात त्यांना टोमॅटोची किंमत १०० रुपये किलोपेक्षा जास्त झाली तरी काही फरक पडणार नाही. ज्यांना फरक पडतो ते सर्व लोक आज चिंतेमध्ये आहेत. ह्या किंमती खाली उतराव्या जेणेकरून लोक रस्त्यावर...